चैतन्यानंद स्वामी पुण्यतिथी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू
आष्टी (प्रतिनिधी) -आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे सालाबाद प्रमाणे प.पू.ब्र.भू.सदगुरू श्री स्वामी चैतन्यानंद महाराज यांचा ५४ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात सुरू होणार असून दि. १७ जानेवारी ते दि.२४ जानेवारी या कालावधीत श्री तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प.पू.ब्र.भू .सदगुरू श्री. चैतन्यानंद स्वामी पुण्यतिथी सोहळा शुक्रवार दि.१७ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात सुरु होत आहे दि १७ रोजी सकाळी ९ वा प.पू . चैतन्य स्वामींची प्रतिमा ,ग्रंथ आणि रामायण कथा प्रवक्ते रामायणाचार्य ह.भ.प.श्रीनिवास महाराज घुगे यांची भव्य मिरवणूक निघेल नंतर संत महंत व मान्यवरांच्या हस्ते वीणापूजन होऊन पुण्यतिथी सोहळयास प्रारंभ होणार आहे. दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे ४ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ८विष्णू सहस्त्रनाम,गीता अध्याय, प्रार्थना, पसायदान,८ ते ८:३० संत पूजा, सकाळी १०ते ११ गाथा भजन,दुपारी १ ते ५ श्री तुलसी रामायण कथा रामायणाचार्य ह.भ.प.श्रीनिवास महाराज घुगे यांच्या रसाळ वाणीतून संपन्न होईल,६ते ७ हरिपाठ, रात्री ७:३० ते ८नाम जप, शुक्रवार दि.१७ जानेवारी रोजी रात्री ९ ते११ या वेळेत ह.भ.प.श्री.अक्षय महाराज उगले यांचे हरिकीर्तन होईल शनिवार दि.१८ जानेवारी रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज साठे यांचे हरिकीर्तन होईल रविवार दि.१९ जानेवारी रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.श्रीनिवास महाराज घुगे यांचे हरिकीर्तन होईल, सोमवार दि.२०जानेवारी रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प.श्री.माऊली महाराज पठाडे यांचे हरिकीर्तन होईल, मंगळवार दि.२१जानेवारी रोजी रात्री ९ ते११ ह.भ.प.श्री.गुरु चंद्रशेखर महाराज देगलुरकर यांचे हरिकीर्तन होईल बुधवार दि.२२ जानेवारी सकाळी प्रवचन १०ते ११ ह.भ.प.भागचंद महाराज झांजे यांचे होईल व रात्री ९ ते ११ ह.भ.प.डॉ.श्री.जलाल महाराज सय्यद यांचे हरिकीर्तन होईल गुरुवार दि.२३जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ कु.ह.भ.प.बालकिर्तनकार ज्ञानेश्वरीताई महाराज पोळ यांची किर्तनसेवा होईल व रात्री ९ ते ११ ह.भ.प.श्री.प्रज्ञाचक्षु मुकुंद काका महाराज जाटदेवळेकर यांचे हरिकीर्तन होईल. शुक्रवार दि.२४जानेवारी रोजी सकाळी ९ ते११ ह.भ.प.श्री.काशिनाथ महाराज (गणेशगड संस्थान नागतळा)यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक निघेल या मिरवणूकीमध्ये चैतन्य स्वामी भजनी मंडळ ,विविध शाळेचे लेझीम पथक सहभागी होणार आहेत मिरवणूकी नंतर काल्याच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक संत महंत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहास उपस्थित राहून श्री तुलसी रामायण कथा श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा अशी देवळाली ग्रामस्थांची नम्र विनंती आहे.
stay connected